Posts

Rain

Image
Horizontal Thoughts And then tonight rain comes over  to meet me .... Standing in window, I and she , we had a glance.... A lot was there to express but .... Don't know from who's side..? She , the rain alone enjoying (perhaps) , falling from the peak of cloud and from the Heart of Sky ...... And yes , rain ....  Was saying a lot .. The joy ,the bliss ,and all was a "was...." Once with teary eyes  and violent noise of her sorrow  all the threads of water glass  attached with Blue heaven ,  yeah ,The falls Sky ....  Eagerd to Kiss The Earth  and to scatter all over .... Alas..! And Me , felt nothing,  but the wet of weight of  her painful tears  from the broken memories  once the rain had .... But unsaid, deep meaningful and expressed..... Ohhh.... Me .. No.. Rain ... Yes ...  Let's listen and get melt into us ...  We....  Our water glass threads  once attached  are  scattered .....  All over, Nowhere...  Dark night  and  a hope for Dawn ... ------- VikramArne.©

कोरोना नंतर .....

कोरोना नंतर ..... आज कोरोनाचा विळखा केवळ भारतालाच पडलेला नसून जगातील जवळ जवळ सर्वच देशांना त्याने आपल्या विळख्यात घेतले आहे . काही देशांनी व तेथील प्रशासनाने वेळीच त्यावर उपाययोजना करण्याची खबरदारी घेतली उदा. भारत . तर   काही देशांनी कोरोनाला तितकेसे गांभीर्याने नाही घेतले उदा. इटली व स्पेन व त्याच पावलावर पाउल ठेवणारा अमेरिका जेथे दिवसाला २३००० च्या आसपास नागरिक कोरोनामुळे बाधित होत असतानाही तेथील प्रशासन अद्यापही लॉक डाउनचा निर्णय घेण्यास असमर्थ ठरलेले आढळले .  कोरोनाचे संकट हे किती दूरगामी परिणाम करणारे असेल हे नुकतेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेने आपल्या निवेदनामध्ये सांगितलेले आहे ; जगात दुसऱ्या महायुद्धानंतर कधी नव्हे ती अशी बिकट परिस्थिती उदभवलेली दिसून येते आहे . तिचा सामना आता केवळ कोणत्या प्रथम , द्वितीय किंवा तिसऱ्या वर्गातील राष्ट्रांनाच करावयाचा नसून सर्वानाच त्याची आर्थिक झळ ही बसणार आहे , किंबहुना ती बसण्यास सुरुवात झालेली आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये .  उद्या आपण सर्वच जेव्हा या कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडू तेव्हा एखादा पूर ओसरल्यावर जशी अवस्था

After Corona ..... (English article)

Image
After Corona ..... Today, Corona's grip is not only on India, but on almost every country in the world.  Some countries and their administrations have taken precautions to address it in a timely manner e.g.  India. So some countries did not take the corona so seriously e.g. In Italy and Spain, as well as in the United States, where around 23,000 citizens a day are affected by corona, the administration is still unable to decide on a lockdown.  The United Nations recently stated in a statement how far-reaching the Corona crisis would be;  Never before since World War II has such a dire situation been seen in the world. It is no exaggeration to say that it is not just a matter of which first, second or third nations will have to face it now, but that it will be a financial blow to all. Tomorrow, when we all come out of this corona, we will see the state of the economy in the same way as when a flood recedes, all chaotic or permanently extinct.  All sectors will now

" कोविड १९ -विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि पालकांची आर्थिक स्थिती . "

Image
" कोविड १९ -विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि पालकांची आर्थिक स्थिती . "               भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा वाढणारा आकडा पाहून मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही साथ आटोक्यात आली नाही तर लॉक डाऊन ३१ मे नंतर ही वाढविण्याची शक्यता वर्तविली . सध्या महाराष्ट्रामध्ये अंतिम पदवी आणि पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात की घेण्यात येऊ नये असा एक वादाचा प्रसंग सुरु आहे . या विषयावर सविस्तरपणे लिहिण्याआधी या वादाची संपूर्ण पार्श्वभूमी समजावून घेणे गरजेचे आहे .  डिसेंबरपासून २०१९ पासून चीनमध्ये कोरोना विषाणूने कशाप्रकारे थैमान घातले आहे या विषयीच्या बातम्यांचे प्रसारण सर्वत्र सुरु होते. व्हाट्स एप्प व इतर सोशल माध्यमातून येणाऱ्या विविध बातम्या व व्हिडिओज वरून आपण येथे भारतात बसून त्याविषयी चर्चा करत बसायचो. त्यावेळच्या काही बोलक्या आणि प्रचलित तथाकथित प्रतिक्रिया- १. आपला भारत हा भौगोलिकदृष्ट्या उष्णकटिबंधात येत असल्याने येथील वातावरणात कोविड १९ विषाणूचा टिकाव लागणे शक्यच नाही. २. भारतातील लोकांची प्रवृत्ती आणि

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना...

Image
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना  स्पर्धा परीक्षा व त्यांच्या अभ्यासाची तयारी पदवीच्या सुरुवातीच्या वर्षा पासूनच क्रमाक्रमाने करणे आज खूपच गरजेचे आहे. कारण आजच्या घडीला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास व त्यांच्या अभ्यासासाठी दिवस-रात्र एक करणारे यांची स्पर्धा ही परस्परांशी सुरू आहे आज स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारणे गरजेचे आहे तो म्हणजे हा अभ्यास मी खरेच माझ्या मनाला वाटत आहे म्हणून मी करत आहे का ? यातील यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेण्याची माझी शारीरिक आणि मानसिक तयारी झालेली आहे का ?आणि जर या प्रश्नांची उत्तरे सकारात्मक असतील तरच या आव्हानांचा सामना करावयास सज्ज व्हावे आणि अशातही या परीक्षांचा काटेकोरपणे नियोजन करून अभ्यास जरी केला तरी यश मिळेलच याची खात्री नसते. त्यामुळे आपण निराश न होता प्रयत्न करतच राहावे स्वतःवर विश्वास ठेवून आपण यशस्वी होण्यासाठी आणखी कशा प्रकारे आपल्या अभ्यासाच्या नियोजनात बदल करणे आवश्यक आहे गरज पडल्यास तज्ञांची मदत घ्यावी विशेष संदर्भ पुस्तकांचा नियमित पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करावा .  स्पर्धा परीक्षांमधून काय मिळणार हा सर्वा
असंच मला खूप काही वाटतं... एका क्षणिक विसाव्याच्या क्षणासाठी जीवनात अगणित अशांत घटनांना सामोरे जावे लागते.नसते जाणीव उद्याची तरीही काळरात्रीच्या गर्भात मृत्यूचे सोंग घेऊन झोपेला जवळ करायचे असते.मग त्यात नकळत भासणाऱ्या गोष्टींना स्वप्न नावाचे अस्तर लावून कधी भयावह तर कधी आनंदित करणाऱ्या क्षणांना पाहत उठायचे असते. कशाला, कशाचीही जाणीव नसताना या नश्वर देहाच्या , व लालसेच्या इच्छा व आकांक्षांच्या पूर्ततेसाठी फक्त झगडून झगडून मरणाच्या खूप खूप जवळ जायचे असते.यशस्वी हे बिरूद नावापुढे लावले तरी मग शांत डोळे मिटण्याचे आव्हान नियतीला मिळत असते.आणि मग या जीवनचक्रात खुप थकलो की पाठीच्या आधारासाठी एक उंच झाड शोधवसं वाटतं, निवांत बसून खळाळत वाहणाऱ्या झऱ्याच्या पाण्यात पाय मोकळे सोडून अविरत बसावसं वाटतं. सकाळ, संध्याकाळ , उन्ह, पाऊस, वारा यांना अनुभवायला मिळायला हवं असं वाटतं. असंच मला खूप काही वाटतं... -विक्रम अरने.